कालसर्प दोष

Call for Price

Availability: In Stock

हिंदी | ENGLISH

कालसर्प हा दोष ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये असतो त्या व्यक्तींना जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागतो,कालसर्प हा दोष बहुतांश पत्रिकेमध्ये आपल्याला बघायला भेटतो. कालसर्प दोष पत्रिकेमध्ये असल्यामुळे जीवनामध्ये नोकरी ,व्यापार, विवाह, शिक्षण, कर्ज, फसवाफसवी, मतभिन्नता, कोर्ट कचोरी, नुकसान अशा विविध समस्या आपल्याला बघायला भेटतात ह्या समस्यांचं निवारण करण्यासाठी कालसर्प पूजा ही खूप महत्त्वाची आहे,  कालसर्प हा विधी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली आहे, जेव्हा कुंडली मध्ये राहू की तू त्यांच्या अंतर्गत काही  ग्रह स्थिती तयार होते त्यावेळेस हा दोष तयार होतो. अशा स्थितीमध्ये शांती पूजा करून आपण आपले दोष ,नकारात्मक ऊर्जा दूर करून जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून सर्व दुष्परिणामांपासून मुक्त होऊन जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो

Categories: , Tags: , , , , , , ,

Description

साइटवर केलेल्या पूजाचे पूर्वावलोकन करा:

कालसर्पदोषाचे लक्षण

* विवाह मध्ये अडचणी असतात

  • नोकरीमध्ये समस्या तयार होतात
  • व्यवसायामध्ये यश नाही
  • कुठलंही काम वेळेवर पूर्ण होत नाही
  • कर्ज वाढत जातं
  • सुख शांती भेटत नाही
  • समृद्धी भरभराटी भेटत नाही
  • मानसिक, ताण तणाव,

 

अजून काही लक्षण कालसर्प दोषाचे आहेत

  • स्वप्नामध्ये वारंवार साप दिसणे
  • स्वप्नामध्ये सारखे सारखे मृत व्यक्ती दिसणे
  • सतत वारंवार भांडण होणे
  • झोपेमध्ये अंगावर साप फिरताना दिसणे
  • कुठल्याही विषयावरती वाद विवाद होणे
  • पतिपत्नी मध्ये मतभेद

 

कालसर्प दोषाचे फायदे

  1. सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त होऊन जीवनातील विघ्न अडीअडचणी दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती होण्यास सुरुवात होते
  2. मानसिक स्वास्थ चांगले लागते मानसिक ताण तणाव, नैराश्य, चिंता यासारख्या समस्या मधून बाहेर येण्यास मदत होते
  3. ही पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते नोकरीतील अडचणी ,व्यापारातील नुकसान, कर्जबाजारी अनपेक्षित खर्च अशा समस्यांवरती मार्ग निघतो
  4. कौटुंबिक जीवन वादविवाद एकमेकांमधील तणाव कमी होतो प्रेमभावना मित्र भावना तयार होण्यास मदत होते  गैरसमज दूर होतात
  5. वैवाहिक जीवनामध्ये मतभिन्नता असेल तर ती कमी होण्यास मदत होते
  6. विवाह सारख्या समस्या सुद्धा दूर होतात चांगल्या ठिकाणी विवाह जमण्यास मदत होते, मनासारखे स्थळ भेटण्यास मदत होते ,लग्नाचे योग लवकर प्राप्त होण्यास मदत होते
  7. शिक्षणाच्या समस्या, करियर बद्दलच्या समस्या याच्यावरती मार्ग निघतो

 

कालसर्प ही पूजा करण्यासाठी योग्य वेळ काय आहे ??

शुभ दिवशी हा विधी केला जातो यासाठी योग्य आणि तज्ञ गुरुजींचा मार्गदर्शन आवश्यक आहे

 

कालसर्प ही पूजा कुठे केली जाते ????

कालसर्प ही पूजा त्र्यंबकेश्वर ,नासिक आणि विविध धार्मिक ठिकाणी किंवा महादेवाच्या मंदिराजवळ ही पूजा केली जाते

 

कालसर्प पूजा

ही पूजा सुरुवात केल्यानंतर संकल्प केला जातो. गणपती पूजा केली जाते .  कलश पूजन केले जाते नंतरून नागांची पूजा केली जाते अभिषेक केला जातो . नवग्रह पूजन केले जाते.  महादेवाची पूजा केली जाते नंतरून हवन केले जाते . यामध्ये काही विशिष्ट हवन सांगितलेले आहेत ते हवन करून पूर्णाहूती केली जाते

 

कालसर्प दोषामुळे जीवनामध्ये येणाऱ्या विविध समस्यांवरती मात करता येऊ शकते  श्रद्धेने ,भक्तीयुक्त अशी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केल्यास या दोषाचे निवारण होऊ शकते यासाठी योग्य पंडित व ज्योतिष तज्ञ अशा गुरुजींच मार्गदर्शन आवश्यक आहे यामुळे जीवनामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आपल्याला मिळवता येऊ शकते

 

आमचे वचन:

  • वैदिक पाठशाळा प्रमाणित आणि अनुभवी पुजारी.
  • सर्व विधी वैदिक नियम  आणि प्रक्रियांचे पालन करणारे गुरुजी
  • पूजेचा आनंददायी अनुभव करून देणारे आणि  उच्च दर्जाची समग्री.
  • वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणाची हमी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कालसर्प दोष”

Your email address will not be published. Required fields are marked *